ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आता केंद्रात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रसंगी संघर्ष करून व्यवस्थेला जेरीस आणू; परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही.
अठरा पगड जातींचा समूह ओबीसीमध्ये मोडतो. त्यांचे अनेक गंभीर प्रश्न समोर आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ओबीसी समाजाने संघटित व्हावे.
ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजांनी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी ज्यांनी ओबीसी समाजाचा वापर केला त्यांच्या भूलथापांना आता बळी पडू नये.
/ In ओबीसी / By admin / Comments Off on ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही.