भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा निषेध.

भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा निषेध.
९ वर्षात भाजप ने देशात रावणसारखी सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण केले होते आणि त्यांना त्रास दिला, त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा विकासाचे सोंग घेऊन बहरूपी बनून देशाचं वाटोळं केलं आहे.
९ वर्षात भाजपने देशात रावणराज निर्माण केले.
महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपच्या खासदाराला पाठीशी घातले.
भाजप सत्तेत असलेल्या मणिपूर मध्ये तेथील आया बहिणींची धिंड काढली जाते पण तिकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही भाजप नेता याबाबत बोलत नाही.
बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांचा सत्कार केला जातो. हे रावणराज नाही तर काय आहे?
रावणराज करणाऱ्या भाजपला स्वतःची लंका जळत असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आमचे नेते राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी हिन पातळीवरील राजकारण सुरू केले आहे.
राजकारणात भाजपने सभ्यतेची पातळी ओलांडली. याविरोधात आज मुंबई मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात सहभागी होवून भाजपच्या कृतीचा निषेध केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते,नेते, पदाधिकारी उपस्थित होते.