काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महामहीम राज्यपालांची भेट घेतली.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महामहीम राज्यपालांची भेट घेतली.
राज्यातील बिमार शासकीय आरोग्यव्यवस्था, कंत्राटी नोकर भरतीमुळे राज्यातील तरुणांचे उध्वस्त होणारे भविष्य व राज्य सरकारचा आरक्षण संपवण्याचा असलेला घाट, दुष्काळी परिस्थिती, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत २२ टक्क्यांनी झालेली वाढ या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महामहीम राज्यपालांकडे विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड व काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.