बहुजन कल्याण विभाग मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाचा आढावा घेतला .

बहुजन कल्याण विभाग मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाचा आढावा घेतला . ५ वर्षात भाजपने ओबीसी प्रवर्गावर किती अन्याय

केला हे माझ्या निदर्शनास आले .

५२% टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाला भाजपने राम , हिंदू आणि इतर गोष्टीमध्ये गुंतवून त्यांचा वापर स्वतः सत्ता भोगण्यासाठी केला .
ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली त्यांच्यासाठी ५ वर्षात फक्त ६० कोटी दिले .
सत्तेत असताना कृती तर सोडा भाजपने ओबीसीसाठी साधे प्रयत्न सुद्धा केले नाही . सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस किंवा भाजपमधील इतर नेत्यांनी ओबीसी प्रश्नांवर एक चकार शब्द सुद्धा काढला नव्हता .
आज मी बहुजन कल्याण मंत्री आहे , ५२% लोकसंख्या असलेल्या प्रवर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करायचे आहे आणि ते मी करत आहे .
त्यासाठी संघर्ष करायची माझी तयारी आहे .
/ In ओबीसी / By admin / Comments Off on बहुजन कल्याण विभाग मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाचा आढावा घेतला .