चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा धरण येथे पर्यटन विकास कामांबाबत व जिल्ह्यातील इतर स्थळांवर नाविन्यपूर्ण पर्यायांचा वापर करून पर्यटनास चालना देण्याबाबत आज मंत्रालय मुंबई येथे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक पार पडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पर्यटन कामांसोबतच यावेळी चंद्रपूर शहरात औष्णिक विद्युत केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे .