जनता कर्फ्युचे पालन व गरज असल्यास बाहेर पडताना मास्कचा वापर करून सहकार्य करावे .

मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात असताना चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता . काल मुंबई वरून परत आल्यानंतर चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला . आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोग्य विभागाशी संबंधित प्रस्तावित मागण्यांना त्वरित मान्यता दिली . वाढत्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतत कार्य करत आहे , नागरिकांनी सुद्धा जनता कर्फ्युचे पालन व गरज असल्यास बाहेर पडताना मास्कचा वापर करून सहकार्य करावे .